Thursday, May 28, 2015

      माजिवडा सेवाभावी ज्येष्ठ नागरिक संस्था       

  registered  ---------          -15-1-2014--                                                                                      ३० एप्रिल २०१३                                   सर्वसाधारण सभेत ---दिनांक ३० एप्रिल २०१३ च्या   मधु मालती  आर्चिड कोम्प्लेक्ष येथील (सभेत .जी.एम) सर्वसाधारण सभेत ७० सभासदांच्या उपस्थितीत संस्थेची अधिकृत स्थापनेची घोषणा  झाली संस्थेचे रजिस्ट्रेशन २७//२०१३ रोजी झाली आहे मधु मालती  आर्चिड कोम्प्लेक्ष येथील सभेत .जी.एम सर्वसाधारण सभेत ७० सभासदांच्या उपस्थितीत संस्थेची अधिकृत स्थापनेची घोषणा  झाली संस्थेचे रजिस्ट्रेशन २७//२०१३ रोजी झाल आहे सभे एकमताने कार्यकारी मंडळ निवडले .  पहिले अधिकृत   अधिवेशन १मे महाराष्ट्रन दिन  रोजी करण्याचे ठरले सभेत एकमताने कार्यकारी मंडळ निवडले .   पहिले अधिकृत   अधिवेशन  मे महाराष्ट्रन दिन  रोजी करण्याचे   ठरल m   


1 May 2013  संस्थेचे प्रथम अधिवेशन  संस्थेच्या सभासदांनीच आर्चिडच्या मैदानावर  सादर केले   .जुन्या पध्दतीची गाणी  व लावणी सुध्द सादर झाली अत्यंत ह्रदयस्पर्शी कार्य क्रमाने सभासद खूप उल्हसित झाले काहींनी ऐनवेळ पुढे येउन   श्री जाखडी ,एक जुने ट्रेड युनियन कार्यकर्ते यानी अमर्शेख्चा महाराष्ट्र पोवाडा गायला आणि मे दिनाचे भान  ठेउन  सार्या  सभेने साथ दिली. सचिव  श्री अनिल भदे    यांनी  काव्यमय सूत्रसंचालन केले  १०० हुन अधिक प्रेक्षक  उपस्थित होते        

        ---    ==========================================================                                                                   
                              ग्रंथ  तुमच्या दारी   २५ मे २०१३ --परमेश्वरी प्या रिडाईज  सोसायटीच्या    पटांगणात ग्रंथ तुमच्या दारी ह्या कार्यक्रमाची   सभा आयोजित करण्यात आली  श्री विनायक रानडे नाशिक हून १०० पुस्तकांची पेटी  घेवून आले होते   श्री. दत्त्राजी साटम यांचे मित्र  हरेली  यानी च्यरिटेबल ट्रस्टचे श्री. पराडकर  ह्यांनी हि पेटी कुसुमाग्रज प्रतिष्ठान चे श्री विनायक रानडे यानी यानी वाचनालया साठि ग्रंथ तुमच्या दारी   कार्यक्रमास दिली व श्री.छत्रे  अध्यक्ष   मा.से,ज्ये.न  यांनी  हि पेटी  वाचनालया साठि सपत्नीक स्वीकारली.. वाचनालय श्री. छत्रे यांचे घरी असणार आहे व त्याची जबाबदारी सौ छत्रे  यानी स्वीकारली व २५ मे २०१३ पासून आजपर्यंत अत्यंत समर्थ पणे संआळ्लि आहे आज वाचनालयाचे 75  सभासद आहेत  


 अध्यक्ष उवाच  --मित्रहो  आपल्या संस्थेची रीतसर  नोंदणी  होउन आज २ वर्षे झाली ह्या काळात आपण अनेक कार्यक्रम, सभासदा  पुढे ठेवले, त्यात  करमणुकीचे तसेच माहिती देणारे  काव्य ,संगित,ओर्केस्त्रा सह संगीताचे,  भावगीतांचे, १ हजारापासून ते १५-२० हजार खर्चाचे  कायक्रम होते.   आपल्यातील मंडली च्या कलागुणाना वाव देणारे ही  कांही कार्यक्रमही होते. पण त्यात इतरा साठिचे काहीही केलेले  नाही 
 . आपण आपल्या   संस्था नोंदणी  करताना संस्थेचे ध्येय  काय हे लिहून  द्यावे लागते. संस्था धर्म जात   राजकीय पक्ष  भेदाभेद न  करता  सामाजिक काम करणार आहे असे स्पष्ठ  करणे   जरुरीचे असते .व तसे लिहूनही  दिलेले आहे .                                                                                      
 आपण गेली दोनवर्षे   विनायक रानडे  संचलित  कुसुमाग्रज प्रतिस्थान प्रणित "ग्रंथ तुमच्या दारी "या  मोफत  वाचनालय( पेटीची )  सोय माजिवड्यातील सर्व साधारण  मध्यमवर्गीय समाजाला करून दिली आहे आणि उत्तम रीतीने   यशस्वी झाली आहे  व आज पर्यंत  आपले 78  सभासद  झाले आहेत व ती सतत वर्धिष्णू आहे.  मध्यंतरी  आपण  एक योगासनाधीष्टीत  व्यायामाचे   मोफत वर्ग  सुरु केले  .पण   योग्य  जागेच्या अभावी ते  तात्पुरते  स्थगीत करावे  लागले .  सार्वजनिक   क्षेत्रात २१ मार्च ला  माजिवड्याच्या प्रतिष्ठेचा गुडी पाडवा शोभायात्रेचा  एक   अभूत पूर्व व सर्व  कार्यक्रम यशस्वी केला याच वर्णन याच अंकात आहेच       
 पण अजुनही आम्ही आपाल्या  ध्येया पासून  आपण दूर आहोत  मुख्य कर्तव्या   पासून लांब  आहोत
आपले कार्यक्रम पुष्कळदा खर्चिक असतात अणि बहुधा   किचेच असतात. ज्येष्ठाच्या व्यथा  माडणारे  व अडचणी साठी ज्येक्ष्ठाना  समुपदेश करणारे नसतात  आरोग्य  स्वतः ची अर्थव्यवस्था ह्याबद्दल हि त्याना माहिती  या सर्वा साठीच्या   कार्यशाळा हव्यात .
 आज देशात ६०% वृध्द नागरिक अर्धपोटी राहतात असा  हेल्पेज संस्थेचा  अहवाल आहे .  उत्पन्न नाही, निवृत्ती वेतन, नाही ,स्वतांची मुले  दुर्लक्ष करतात  अपमान, करतात,  मारतात,  घरा बाहेर काढतात अश्या अनेक हकीगती आहेत.   उतारवयात नोकरी कोण देणार  कुठे जागा  मिळणार  असे अनेक निर्वासित  ज्येष्ठ नागरिक आम्ही पाहिले आहेत  अनेक मध्यम वर्गीय ज्येष्ठ परिस्थितीमुळे  खाजगी छोट्या  हलक्या   धंद्यात  वा   दुकानात  झाडू मारणे  सारखी  कामे  वा  मिळेते  ते  काम  करतात -रस्त्यावर झोपतात ----------------   आज   सुस्थितीत  असलेल्या  ज्येष्ठ  नागरिकांनी, संस्थानी    त्याना मदतीचा हात   द्यायला पाहिजे .मदत पैशांनीच    करायाला नको असंते   सरकारी मदत ,----- मिळण्यासाठी  ज्येष्ठ नागरिकाना अनेक फार्म्स भरावे लागतात  त्याची चोकशी करून ते पुढे पाठवणे ह्या कामात आपल्या कडील कांही स्वयंसेवक तयार होऊ शकतील  ----- अनेक ज्येष्ठ  महिनोन महिने  दवाखान्यात खितपत पडलेले आहेत   ---------४ -ते ६ या  वेळात जावून त्या ना  फळे   फुले  देणे ,  पेपर  वाचून दाखवणे  त्यांच्या काही तक्रारी  संघा तर्फे दूर करणे. हे काम आपण करू शकतो   त्या साठी काही स्वयंसेवक आपण निवडावे   आज आपण  जर  अगदी  सुखी   जीवन  जगत आहोत  तर . चैन  करून मिळणार्या सुखापेक्षा   जे  आपले  सम वयस्क  परिस्थिती ने   नाडले  गेले  आहेत  त्यांच्या जीवनांत आनंद निर्माण करता आला तर तो अधिक सुखाचा  असतो. काल्पनिक   पुण्या पेक्षा हे पुण्य शतपटिन मोठ असेल. ज्या समाजातुन आपण  पुढ आलो  त्याची  आपल्याशी  बांधीलकी आहे.आपल्याच समाजातील  दुःखी समवयस्काला  आपण मदत करण हे ज्येष्ठांचे   श्रेष्ठ  कर्तव्य ठरत. तरुणपणी  आपल्याला अनेक  ज्ञात वा अज्ञात  व्यक्तींनी, संस्थानी मदत केलीली असते  हे समाजाच ऋण आहे . आजचे  आपले फोन , प्रवास  आरोग्य हे  दैनदिन व्यवहार सुध्दा समाजाच्या सहकार्यावर अवलंबुन असतात ही सुध्दा  सामाजिक  बांधीलकी आहे    &&&& तेंव्हा माझ्याही खांद्यावर याचा थोडा भार आहे हि जाणीव ठेवणे काळाची गरज आहे   ज्येष्ठ नागरिक संघाचा चा उद्देश- हाच आहे --------------------       आपण जर सुखा समाधानात असू पण  जे वयस्क ज्येष्ठ  आज परिस्थीमुळे  वा मुलांबाळा कडुन नाडले गेलॆले आहे त्याना   धीर देणे अगत्याचे ---अनेक वृद्ध वयाच्या ७०-७५ व्या वर्षीही  काबड कष्ठ करून धडपडत ठेचकाळत जीवन कंठत आहे आपल्याला कर्तबदार  मुलाच्या मुळे वा कमावून ठेवलेल्या पैशामुळे   कष्ठा  शिवाया सुखासमाधानाने  चैनीत राहता यत असेल तर आपल्या  दुर्दैवी समवयस्काना   थोडासा   आधार देण पैशाने शक्य नाही तर इतर मार्गाने,  ही  आपली सामाजिक  बांधिलकी आहे आज ह्याच भान ठेवणं जरूर आहे  जगभर ज्येष्ठ नागरिक संस्था स्थापन झाल्या  आहेत  त्या तेव्हढ्याच उद्देशाने   & &  &  आपली  संस्था  एक सामाजिक कार्य करणारी मोठी  एन.जी.ओ व्हावी अशी दृष्ठी ठेवून माजिवड्यातिल जनतेत कार्य करत आहोत तर  आपल्याच  सभासदांच्या साठी  मोठे  खर्चीक  कार्यक्रम करुन  हे साधणार  नाही जो पर्यंत आपण समाजातील दुर्बल  घटकासाठी काही करु शकत नाही तोपर्यंत आपण  समाजात वाढू शकत नाही  ८-१० वर्षापूर्वी आपल्यातल्या कांही  ३-४ भगिनी संस्कार वर्ग चालू करण्याचा विचार करता होत्या  तसेच  मुनिसिपाल शाळातील मागे पडलेल्या  विद्यार्थ्या ना एक सामाजिक जबाबदारी म्हणुन मोफत  शिकावण्याचे काम करत होत्या २ वर्षे त्यानी काम केला  पण  त्याना  पाठींबा मिळाला नाही उपक्रम बंद झाला आपल्या संस्थे सारखी  संस्था असती तर  कदाचित बाल  संस्कार वर्ग   हे  शिक्षणाचे दोन्ही कार्ये वाढिस लागली असती . संस्था   स्वतः  साठी किती   मोठमोठे कार्यक्रम करते यावर ती मोठी होत नाही नांवरुपाला  येत नाही   माझा  संस्था स्थापन करण्या मागे   हाच एद्देश होता  लहान मुले , विद्यार्थी ,ज्येष्ठ नागरिक  यांच्या साठी कांही ,त्याना आधर देण्या च कार्य करता याव. आपल्याच  सभासदांसाठी  करमणुकीचे कार्यक्रम जेवणावळी खर्चीक सहली काढून  फक्त क्लब निर्माण होतो. पण त्या क्लब    अनेक  सामाजिक  संस्थाना मोठ मोठ्या  डोनेशन  देत असतात  वत्यामुळे समाजात त्यांचे मानाचे स्थान असते .  आपण हे करू शकतो  कां? क्लब फक्त  कोट्याधीश, अब्ज्या धिशच काढू शकतात आपल्यातील तश्या मंड ळिनि पुढे यावे.  
  टी आय.एस.एस. च्या अभ्यास क्रमांअंतर्गत  अनेक वृध्दाश्रमात  पैसेवाल्या महागड्या वा गरीब वृध्दाश्रमात   या दोन्ही  ठिकाणाचे   आमचे अनुभव हृदयाला घरे पाडणारे आहेत   काही ज्ये ना.सं. त्याना मदत करताना  पाहायला मिळाले वरवर  सुखी  दिसणारी   ज्येष्ठ मंडळी  आतून   . मानसिक  दृष्ट्या  खुप    दुःखात ,  हालात  असतात     अगदी आपल्या जवळचाच एखादा वृध्द   राहवत नाही अस  झाल्यावर ज्या काही हकीगती सांगतो तेंव्हा धक्काच बसतो   ह्या   वृध्दाच्या  दु  खः   व्यथा  पाहुन मालतीबाई बेडेकरांच्या  तरुण स्त्रीयां  वरील  लिहिलेल्या  "कळ्याचे  निश्वास"या पुस्तकाची आठवण येते . आपल्या जवळची  अनेक थकली भागलेली वयस्क आणसे याचा हवाला देतील    यासाठी  सामोपचार  चे  समुपोदेशनाचे  मार्ग  आहेत  आपण या कडे लक्ष देऊया  
 ओरनगाबाद्चा   ज्येष्ठ  नागरिक संघ    तेथली  सर्व  बगर टेक्निकला   कामे  संभाळ्तो.  कुर्ला सेवाभावी ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकर्ते  अशिक्षित वा अती वृध्द ज्येष्ठाना सरकारी (संजय गांधी योजना ) योजनेचे फोरम्स भरून देतात  मुलं येथील कांही  कार्यकर्ते  दवाखान्या त जावून  पेपर वाचुन  दाखवतात, तर कधी फळे , फुले देवून त्याचे  अभिष्ठ  चिंतन  करतात.अशी अनेक उदाहरणे देता येतील
1९९९ मध्ये भारत सरकारने  ज्येष्ठा साठी अनेक  योजना  कार्यान्वित करण्याचे दिलेले अभिवचन पाळलेले नाही त्यासाठी सरकारवर दडपंण आणणे साठी   महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघा तर्फे  चाललेल्या  शांततामय  चळवळीत आपल्या संघाने सहभाग घ्यायला हवा   या सर्व गोष्ठीची  चर्चा  आपल्या आम सभेत करूया  व त्यावर निर्णय घेवुन कायाला लागुया असे वाटते. आपणा पैकी बहुतापेक्क्षा   मी वयाने बराच वयस्क आहे तेंव्हा जरा ज्यास्तच टिका केली  तरी क्षमस्व    
prabhakar chhatre.         5 May 2015 Sanchar 






                                                                                                                                                  

1 comment:

  1. अध्यक्ष उवाच --A good advice by President as now days Senior citizen sangh are turning to club so poor citizens are not getting any help So it is quite advisable to to think for our brothers andsisters who are in great difficulty

    ReplyDelete